२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे २७५–३०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे १३०० असून त्यामध्ये सुमारे ६५० पुरुष व ६५० महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या अंदाजे १५०–१६० असून त्यामध्ये जवळपास ७५ मुलगे व ७५ मुली आहेत.
मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) समाजातील लोक येथे राहतात तसेच काही प्रमाणात कुणबी समाज देखील आहे. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज प्रामुख्याने शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरी काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन सुद्धा करतात.
श्रावण महिन्यात, विशेषतः ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना, पावसाळ्यात रानात एक नैसर्गिक भाजी उगवते तिला अळंबी म्हणतात.
ही भाजी अतिशय चवदार व पौष्टिक असते. ही भाजी उगवल्यानंतर लगेच काढावी लागते, अन्यथा ती लवकर फुलून खाण्यास अयोग्य होते. पहाटे लवकर उठून आदिवासी बांधव ही भाजी शोधून फुलण्याआधीच खुडून काढतात, स्वच्छ करून ती लगेच बाजारात विक्रीसाठी नेतात.
या माध्यमातून पावसाळ्यात त्यांना अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.